महाराष्ट्रात भाजप-शिवसेना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विश्वास

लोकसभेला ४६, विधानसभेत १९० जागा जिंकणार


सांगली (प्रतिनिधी) : २०३० पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४६, तर विधानसभेच्या १९० जागा भाजप जिंकेल, असा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री राणे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.


दरम्यान नारायण राणे यांनी यावेळी ‘कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही’, असे सांगत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मी तसे काही बोललोच नाही’, असे स्पष्टीकरणही दिले.


मराठा आरक्षणाबाबत बोलताना नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. राज्यातील शिंदे-भाजपचे सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे टिकेल. राज्यातील सरकार चांगले काम करीत असल्याचे सांगितले.



४०३ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट


नारायण राणे म्हणाले, लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत भाजपने ४०३ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माझ्याकडे दक्षिण गोवा, दक्षिण मुंबई व सांगली लोकसभेची जबाबदारी आहे. गतवेळेपेक्षा सांगलीचा खासदार तीन लाख मतांनी विजयी होईल. एकसंघ व एक विचाराने भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय, विविध योजना, भाजपचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



अजित पवारांची भेट नाही


अजित पवार यांच्या राजकीय हालचालीबाबत राणे म्हणाले की, काही महिन्यांपासून त्यांची भेट झालेली नाही. दूरध्वनी झाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे, हे माहीत नाही. त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, हे वरिष्ठ नेते बघतील, तपासून घेतील. असे यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत