पुणे विद्यापीठातील रॅपरवरुन महाविकास आघाडीमध्ये फूट

पुणे: पुण्यातील शुभम जाधव रॅपर प्रकरणात महाविकास आघाडीच्याच दोन नेत्यांमध्ये फुट पडल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेत रॅपचं शूटिंग झाल्याची तक्रार विदयापीठ प्रशासनाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र विद्यापीठातच हे रॅप साँग शुट झाल्याने प्रशासनातील व्यक्तींकडूनच हे रॅप साँग तयार करण्यासाठी मदत करण्यात आल्याचे समोर येत आहे. तसेच त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उबाठा गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीतील धूसफूस समोर आली आहे.


काही दिवसांपूर्वी शुभमच्या रॅप साँगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार दिली होती. त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला होता. मात्र आता विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून शुटींगसाठी मदत मिळाली असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारुची बाटली ठेवून हे रॅप साँग शुट करण्यात आलं आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलिसांनी संबंधित रॅपरला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर या प्रकरणात रॅपरला पाठिंबा देत पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता.





मात्र, हे सगळं प्रकरण निंदनीय असल्याचं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, या रॅप साँग मध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि त्यात वापरण्यात आलेली हत्यारं ही विद्यापीठाच्या परिसरात वापरणं हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. आम्ही पदाधिकारी आणि बाकी कार्यकर्ते जेव्हा या विद्यापीठाच्या परिसरात येतो तेव्हा सगळ्यांची चौकशी सुरक्षारक्षकांकडून केली जाते आणि कमीत कमी पदाधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जातो. असं होत असताना जर शुटींग, अश्लील भाषा वापरुन रॅप गाणं तयार केलं जात असेल आणि तलवारी काढल्या जात असतील तर यावर कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद