प्रहार    

राजकीय उलथापालथ होणार?

  193

राजकीय उलथापालथ होणार?

मुंबई : जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज मुंबईत येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या राजकीय घडामोडीत नार्वेकर मुंबईत येणार म्हणजे राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेले आहेत.


दरम्यान अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरू असताना स्वत: अजित पवार यांनी यावर आपण अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचा स्पष्ट खुलासा केला आहे. असे असले तरी राहुल नार्वेकर यांना तातडीने का बोलवण्यात आले, असा सवाल अनेकांना पडला आहे.


राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता पाहता पडद्यामागे मोठे राजकारण सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे.


दरम्यान, १६ मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रजूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या निकालाकडे आता सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. येत्या आठवडाभरात हा निकाल लागेल, अशी शक्यता आज शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.


तर, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत आता लवकरच हा निकाल येईल. यात शिंदे गटाचे १६ आमदार नक्की अपात्र होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर येत्या दोन दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, त्यातली एक दिल्लीत होईल आणि दुसरी महाराष्ट्रात होईल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.


यामुळे निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भाजपची यापुढची रणनिती काय असेल याबाबत राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : महायुतीचा विजय हिंदूंच्या मतांवर, बाकी धर्मियांचे मतदान शून्य : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूण येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या राखी संकलन कार्यक्रमात राज्याचे

कबुतरखान्यावर तोडगा काढणार १२ तज्ज्ञांची समिती

मुंबई : कबुतरखान्यांमुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर

Devendra Fadnavis BDD Chawl : 'छप्पर गळतंय, भिंती पडतायत'… BDD रहिवाशांचा मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेला हृदयद्रावक किस्सा

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला आज ऐतिहासिक वळण मिळाले. मुख्यमंत्री

कबुतरखान्यावर राज ठाकरेंची पहिली सडेतोड प्रतिक्रिया "या वादात लोढा-बिढांनी येऊ नये"

मुंबई : गेल्या काही दिवसापासून दादरमधील कबुतरखाना वाद पेटला असून कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज चांगलाच

Shilpa Shetty And Raj Kundra : ६० कोटींचा घोटाळा? शिल्पा-राज पुन्हा कोर्टाच्या दारात, आता काय केलं नेमकं?

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) वादाच्या भोवऱ्यात अडकले

Shilpa Shirodkar Car Accident : बिग बॉस १८’ फेम शिल्पा शिरोडकरचा कार अपघात; बसची कारला जोरदार धडक, पोस्ट शेअर म्हणाली...

मुंबई : ‘बिग बॉस १८’मुळे (Bigg Boss 18) पुन्हा एकदा चर्चेत आलेली आणि आपल्या सौंदर्यानं नव्वदच्या दशकात गाजवलेली