राजकीय उलथापालथ होणार?

मुंबई : जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज मुंबईत येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या राजकीय घडामोडीत नार्वेकर मुंबईत येणार म्हणजे राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेले आहेत.


दरम्यान अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरू असताना स्वत: अजित पवार यांनी यावर आपण अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचा स्पष्ट खुलासा केला आहे. असे असले तरी राहुल नार्वेकर यांना तातडीने का बोलवण्यात आले, असा सवाल अनेकांना पडला आहे.


राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता पाहता पडद्यामागे मोठे राजकारण सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे.


दरम्यान, १६ मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रजूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या निकालाकडे आता सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. येत्या आठवडाभरात हा निकाल लागेल, अशी शक्यता आज शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.


तर, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत आता लवकरच हा निकाल येईल. यात शिंदे गटाचे १६ आमदार नक्की अपात्र होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर येत्या दोन दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, त्यातली एक दिल्लीत होईल आणि दुसरी महाराष्ट्रात होईल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.


यामुळे निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भाजपची यापुढची रणनिती काय असेल याबाबत राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी