नाशिकमधील गोहत्या थांबणार कधी?

नाशिक : रोज दहा टन गोमांस मुंबईसह अन्य शहरात विक्रीसाठी पाठविणारा गोमांस व्यापारी किती गोवंशाची कत्तल करीत असेल? त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे अनेक सवाल उपस्थित करून एका गोरक्षक नागरिकाने १३ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, लोकायुक्त, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, पोलीस यंत्रणा यांना नाशिकमध्ये खुलेआम सुरू असलेल्या गोहत्येबाबत अर्ज दिला आहे. या अर्जाद्वारे त्यांनी नाशिकमधील गोहत्या थांबविण्याची मागणी केली आहे. मात्र या अर्जावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.


वडाळा येथे रोज शेकडो गोवंशाची कत्तल केली जाते व नाशिक शहरासह मुंबई व इतर ठिकाणी पाठवले जातात, जवळपास दहा ते बारा टन गोमांस रोज विक्री केले जाते, अशी धक्कादायक माहिती एका गोवंश बचावासाठी पुढाकार घेतलेल्या अर्जामुळे समोर आली आहे. खरंतर यावर गंभीरतेने प्रशासनाने दखल घ्यायला हवी परंतु मुक्या जनावराप्रमाणे यंत्रणादेखील मुखी व हातबल झाल्याचे चित्र सुसंस्कृत मनाला चटका लावून जाणारे आहे.


तांत्रिक यंत्रणा वापरा आणि पडताळा सत्यता


तांत्रिक यंत्रणेच्या जोरावर अनेक गुन्हेगारांना तुरुंगात डांबल्याचे आपण बघितले आहे. उघड्या डोळ्यांनी दिसणारा अवैध धंदा बंद करण्यासाठी व त्यावर कारवाई करण्यासाठी फक्त योग्य मानसिकता गरजेची आहे. परंतु धंदाच नाही असे सोंग घेणाऱ्यांसाठी अर्जदाराने चक्क वडाळा नाका येथील अवैध गोवंश विक्री होत असलेल्या ठिकाणाचा गुगलसारख्या तांत्रिक यंत्रणेचा वापर करून पोलिसांनी शोध घ्यावा आणि उचित ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात संजेरी मेडिकलच्या जवळ असलेले मोठ्याचे मटन दुकान हे स्पष्ट गुगल मॅप वर दिसून येते. तरीही यंत्रणा ढिम्म हे यातून स्पष्ट होते.


शहरातील वडाळा नाका परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला अवैध कत्तलखाना आजी माजी लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने सुरू असल्याचा आरोपही या अर्जदाराने केला आहे.


कट मारल्याचा राग, पाठलाग केला पण...?


दोन-चार दिवसांपूर्वीच पालक मंत्री दादा भुसे यांच्या ताब्यातील गाडीला एका पिकअपने कट मारला व सुसाट वेगाने पळून जात असताना दादांनी त्याचा पाठलाग करून त्या पिकअप गाडी चालकाला थांबवले व त्याच्या गाडीत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशाची सुटका केल्याने हा मोठा चर्चेचा विषय बनला होता. त्यावर दादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


दादांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गो हत्या करणाऱ्यांवर तसेच गोमांस विक्री करणाऱ्या तस्करांची गय केली जाणार नाही असे बोलून दाखवले. मात्र शहरात इतका मोठा कत्तलखाना सुरु असताना दादा स्थित प्रज्ञ का? तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर देखील किमान या अवैध धंद्यावर योग्य कारवाई करण्यासाठी पाऊल उचलणे अपेक्षित होते.


पुराव्यासह अर्ज, मग प्रतीक्षा कसली?


कत्तलखाना चालवणाऱ्यांच्या नावासहित अर्जदाराने तक्रारी अर्ज केला आहे ज्यामध्ये संशयित कुठल्याही थराला जाऊ शकतात तसेच आपली हत्या देखील ते घडवून आणू शकतात ही त्यांच्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे असे नमूद करत, अर्जदाराने गोरक्षणासाठी जीवावर उदार होत अवैध कत्तलखान्याविरोधात अर्ज दिलेला आहे. कत्तलखान्याचा मालक व त्याचे इतर सहकारी यांचा स्पष्ट नामोल्लेख अर्जात आहे. या अर्जाची गंभीरतेने पोलीस विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया