पियुष गोयल आणि स्मृती इराणींच्या ओएसडींची अचानक हकालपट्टी का केली?

नवी दिल्ली : केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री पीयुष गोयल आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची (ओएसडी) अचानक हकालपट्टी करण्यात आली आहे. ज्या अपॉईंटमेंट कमिटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघे सदस्य आहेत. त्याच कमिटीने हा निर्णय घेतल्याने या तडकाफडकी निर्णयामागची नेमकी गोम काय आहे, यात नेमके काय दडले आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगली आहे.


पीयुष गोयल यांचे ओएसडी अनुज गुप्ता आणि स्मृती इराणी यांच्या ओएसडी देवांशी विरेन शाह यांची मुदत संपण्यापूर्वीच त्यांना पदावरुन हटवले आहे.


ओसएडींचा कार्यकाळ सहसा पाच वर्षे किंवा मंत्र्यांची इच्छा असेपर्यंत असा असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या ओएसडींना हटवणे म्हणजे तो मंत्र्यांसाठीही संदेश मानला जातोच. पण अनुज गुप्ता, देवांशी शाह या दोघांचेही म्हणणे आहे की त्यांनी वैयक्तिक कारणामुळे पद सोडले आहे.


परंतू हे कारण त्यांनी सांगितले असले तरीही गोयल आणि इराणी यांच्या ओएसडींना मुदतीआधीच तडकाफडकी हटवण्यामागच्या मोदी आणि शाह यांच्या या कारवाई मागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


दरम्यान, मंत्रिमंडळाच्या यादीत मोदी-शाहांचे धक्कातंत्र काय असते याचा अनुभव सर्वांना आहे. हर्षवर्धन, रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनी त्याचा अनुभव घेतला आहे.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय