पियुष गोयल आणि स्मृती इराणींच्या ओएसडींची अचानक हकालपट्टी का केली?

  227

नवी दिल्ली : केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री पीयुष गोयल आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची (ओएसडी) अचानक हकालपट्टी करण्यात आली आहे. ज्या अपॉईंटमेंट कमिटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघे सदस्य आहेत. त्याच कमिटीने हा निर्णय घेतल्याने या तडकाफडकी निर्णयामागची नेमकी गोम काय आहे, यात नेमके काय दडले आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगली आहे.


पीयुष गोयल यांचे ओएसडी अनुज गुप्ता आणि स्मृती इराणी यांच्या ओएसडी देवांशी विरेन शाह यांची मुदत संपण्यापूर्वीच त्यांना पदावरुन हटवले आहे.


ओसएडींचा कार्यकाळ सहसा पाच वर्षे किंवा मंत्र्यांची इच्छा असेपर्यंत असा असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या ओएसडींना हटवणे म्हणजे तो मंत्र्यांसाठीही संदेश मानला जातोच. पण अनुज गुप्ता, देवांशी शाह या दोघांचेही म्हणणे आहे की त्यांनी वैयक्तिक कारणामुळे पद सोडले आहे.


परंतू हे कारण त्यांनी सांगितले असले तरीही गोयल आणि इराणी यांच्या ओएसडींना मुदतीआधीच तडकाफडकी हटवण्यामागच्या मोदी आणि शाह यांच्या या कारवाई मागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


दरम्यान, मंत्रिमंडळाच्या यादीत मोदी-शाहांचे धक्कातंत्र काय असते याचा अनुभव सर्वांना आहे. हर्षवर्धन, रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनी त्याचा अनुभव घेतला आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.