‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ या शब्दाला महिला संघटनांचा आक्षेप

Share

विधवा महिलांना यापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करण्याच्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना

मुंबई : राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. मात्र, तसा उल्लेख केल्यास समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होईल, असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे.

समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अपंग’ ऐवजी ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग रुढ केला. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. याच धर्तीवर राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असा आदेश लोढा यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिला आहे.

महिला आयोगाकडून विधवा महिलांच्या नावाविषयी काही सूचना आल्या होत्या. ज्या सूचना आल्या होत्या त्यापैकी एक सूचना अशी होती की, महाराष्ट्रात महिलांसाठी गंगा भागिरथी हे नाव प्रचलित आहे. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. सध्या हा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी हा प्रस्ताव पाठवल्याचे मंगलप्रसाद लोढा म्हणाले.

हे पण वाचा : पुरुषाची बायको जाते तेव्हा तुम्ही काही लावता का?

मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या फक्त प्रस्ताव तयार करून चर्चा करण्याची सूचना प्रधान सचिवांना केली आहे. मात्र चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, विधवा महिलांचा गंगा भागिरथी (गं. भा.) असा उल्लेख करून त्यांची समाजात ओळख करून देण्यामागे उद्देश काय आहे? सरकारी योजनेचा लाभ मिळणार असेल तर तसा उल्लेख एक वेळ समजू शकले असते. केवळ प्रसिद्धीसाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. मंत्र्यांनी महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, असे मत जनवादी महिला संघटना आणि घरेलू कामगार संघटना अध्यक्षा किरण मोघे यांनी व्यक्त केले.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

27 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago