एखाद्याला राजकारणातून संपवून टाकायचे असेल तर शरद पवार काय खेळी करतात?

शहाजी बापू पाटील यांनी केला खळबळजनक खुलासा...


सांगोला: शरद पवारांना (Sharad Pawar) ज्याला कुणाला राजकारणातून संपवायचे असल्यास ते त्यांना जवळ घेतात व राजकारणातून संपवून टाकतात, असं खळबळजनक विधान शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केले आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्ष व इतर अनेक छोटे-मोठे पक्ष संपवून टाकले, असेही ते म्हणाले आहेत.


शहाजी बापू पाटील हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना त्यांच्या एक डायलॉग खूप फेमस झाला होता. 'काय डोंगार, काय झाडी. एकदम ओके' या डायलॉगमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले होते. त्यानंतरदेखील त्यांची वक्तव्य कायम चर्चेत राहिली आहेत. आता त्यांच्या शरद पवारांवरील वक्तव्याने खळबळ उडाली आहे.


त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दलही खळबळजनक विधान केले आहे. अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा प्लॅन होता की, शिवसेनेच्या आमदारांची संख्या १० ते १५ च्यावर जाऊ द्यायची नाही. तसेच आमचे ४० आमदार पाडण्याची तयारी अजित पवार व बाळासाहेब थोरातांनी केली होती, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुकीत माझे तिकीट कापण्याची तयारी देखील अजित पवारांनी केली होती, असे ते म्हणाले आहेत.


दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे देखील होते. शहाजी बापूंच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ होत असून यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजी बापूंनी ही खळबळजनक विधाने केली.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक