अण्णा हजारेंना धमकी! महाराष्ट्रात खळबळ, धमकी देणारा माणूस आहे....

श्रीरामपूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना एकाने हत्या करण्याची धमकी दिलीय. मी १ मे रोजी अण्णा हजारे यांना संपवणार असल्याचं एक पत्रच एका शेतकऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठवलंय.


अण्णा हजारे यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधनी या शेतकऱ्याने हे पत्र पोलिसांना पाठवलं आहे. गायधनी यांचे शेतीचे वाद आहेत. त्यामध्ये हजारे लक्ष घालत नसल्याचा आरोप त्याने केला आहे. यामुळे त्याने १ मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन हत्या करणार असल्याची धमकी दिली आहे.


त्याने पत्रात असं म्हटलंय की, मी एक सर्वसामान्य शेतकरी असून माझ्या कौटुंबिक शेतीच्या वादाच्या कारणातून माझ्या गावातील ९६ लोकांनी एकत्र येऊन माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे.


तसेच शेलार बाई नावाच्या दलित महिलेने माझ्यावर खोटी ट्रॉसिटी (Atrocity) केस दाखल करण्याचा कट रचला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास मी १ मे रोजी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे साहेब यांची हत्या करणार असल्याचा इशाराच या शेतकऱ्याने दिला आहे.


या प्रकरणाबाबत मी सविस्तर तक्रार श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेली असून याची नोंद घ्यावी, अशी विनंती धमकी देणाऱ्या शेतकऱ्याने केलीय.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे