अण्णा हजारेंना धमकी! महाराष्ट्रात खळबळ, धमकी देणारा माणूस आहे....

श्रीरामपूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना एकाने हत्या करण्याची धमकी दिलीय. मी १ मे रोजी अण्णा हजारे यांना संपवणार असल्याचं एक पत्रच एका शेतकऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठवलंय.


अण्णा हजारे यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधनी या शेतकऱ्याने हे पत्र पोलिसांना पाठवलं आहे. गायधनी यांचे शेतीचे वाद आहेत. त्यामध्ये हजारे लक्ष घालत नसल्याचा आरोप त्याने केला आहे. यामुळे त्याने १ मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन हत्या करणार असल्याची धमकी दिली आहे.


त्याने पत्रात असं म्हटलंय की, मी एक सर्वसामान्य शेतकरी असून माझ्या कौटुंबिक शेतीच्या वादाच्या कारणातून माझ्या गावातील ९६ लोकांनी एकत्र येऊन माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे.


तसेच शेलार बाई नावाच्या दलित महिलेने माझ्यावर खोटी ट्रॉसिटी (Atrocity) केस दाखल करण्याचा कट रचला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास मी १ मे रोजी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे साहेब यांची हत्या करणार असल्याचा इशाराच या शेतकऱ्याने दिला आहे.


या प्रकरणाबाबत मी सविस्तर तक्रार श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेली असून याची नोंद घ्यावी, अशी विनंती धमकी देणाऱ्या शेतकऱ्याने केलीय.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु