विनायक राऊतला नारायण राणेच धडा शिकवू शकतात....

संजय शिरसाट यांचे विधान


छत्रपती संभाजीनगर : विनायक राऊतची औकात काय? त्याला प्रत्युत्तर फक्त केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेच देऊ शकतात. विनायक राऊतला धडा शिकवण्याची धमक माननीय नारायण राणे यांच्याकडेच आहे व ते त्यांना पुरुन उरलेत, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी विनायक राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.


विनायक राऊत वांरवार शिवसेनेवर आरोप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी टीका करत त्यांनी शिवसेनेतील आमदार बंडखोरी करणार आहेत, असा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना नाही तर उद्धव गटाचे आमदार बंडखोरी करणार आहेत. तेच आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.


विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेविरोधात असे बोलणे शोभत नाही असा टोला लगावत विनायक राऊत यांना नारायण राणेच धडा शिकवू शकतात, असे संजय शिरसाट म्हणाले.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे