मालवणीची ‘दंगल’ पूर्वनियोजित होती

पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड


मुंबई : मालाड मधील मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक कट रचून केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीमधून उघडकीस आली आहे. त्याप्रमाणे आता अटक आरोपींच्या विरोधात नव्याने वेगवेगळी कलम लावण्यात येत आहेत.


मालवणीत दरवर्षी राम नवमी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्त दरवर्षी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र मिरवणूक ठराविक वस्तीजवळ आली असता मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक सुरू झाली होती. सर्व बाजूने दगडफेक होत होती.


यामुळे मिरवणूक तिथल्यातिथे थांबविण्यात आली आणि कोण दगडफेक करत आहे याचा कार्यकर्ते शोध घेऊ लागले. सोबत असलेले पोलीस ही शोध घेऊ लागले. यावेळी काही तरुण दगडफेक करत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले. त्या दिवशी पोलिसांनी वीस जणांना अटक केली व गुन्हा नोंदवला. यात एकूण २०० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी २० जणांना अटक करून बाकीच्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या अटक आरोपीवर दंगल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुढील तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ही दगडफेक कट रचून केल्याचे आता चौकशीत उघडकीस आले आहे.


दगडफेक करणाऱ्यांचे काही म्होरके आहेत. त्यांनी आधीच लोकांची जमवाजमव केली होती. दगड आणून ठेवले होते. याबाबत दोन पोलिसांनी महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. मालवणी पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे एक शिपाई आणि मालवणी पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल यांनी हे पुरावे गोळा केले आहेत. त्या आधारावर आता आरोपींच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपात बदल करण्यात येणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका

ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर