केकेआरचा गुजरातवर रोमहर्षक विजय

रिंकूची तुफानी खेळी


अहमदाबाद (वृत्तसंस्था) : व्यंकटेश अय्यरच्या (८३ धावा) आणि नितिश राणा या जोडगोळीने कोलकाताला संकटातून सावरले. मात्र तरीही केकेआरसाठी विजय दूरच होता. रिंकू सिंगने अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडत कोलकाताला अनपेक्षित विजय मिळवून दिला. केकेआरने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत ३ विकेट राखून गुजरात टायटन्सवर सरशी साधली.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकाताचे सलामीवीर धावा जमवण्यात अपयशी ठरले. रहमनुल्लाह गुरबाज आणि नारायण जगादेस्सन हे सलामीवीर स्वस्तात परतले. व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार नितिश राणा यांनी संघाला सावरत विजयाच्या मार्गावर आणले. व्यंकटेशने ८३, तर नितिशने ४५ धावा जमवल्या. मात्र हे दोघेही बाद झाल्यावर केकेआरचा विजय कठीण झाला होता. दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या, तरीही रिंकू सिंगने फटकेबाजी काही थांबवली नाही. रिंकूने २१ चेंडूंत नाबाद ४८ धावा तडकावत केकेआरला अनपेक्षित विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीत १ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकातील अखेरच्या पाचही चेंडूंवर रिंकूने षटकारांची आतषबाजी करत केकेआरला विजय मिळवून दिला. गुजरातच्या राशिद खानने ३ बळी मिळवले, तर अल्झेरी जोसेफने २ विकेट मिळवल्या. यश दयाल मात्र सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ६९ धावा दिल्या.


विजय शंकर आणि साई सुदर्शन यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या बळावर गुजरातने निर्धारित २० षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात २०४ धावांचा डोंगर उभारला. विजय शंकरने झंझावाती फलंदाजी करत अखेरच्या षटकांत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विजयने २४ चेंडूंत ६३ धावांची वादळी खेळी खेळली. तर साई सुदर्शनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकाला गवसणी घातली. गुजरातचा संघ अडचणीत सापडला तेव्हा साई सुदर्शनने विस्फोटक अर्धशतक झळकावले. साईने ३८ चेंडूंत ५३ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील हे त्याचे दुसरे अर्धशतक होय. शुभमन गिलने ३९ धावांची जोड दिली. कोलकाताचा सुनिल नरिन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ३३ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडले. तर सुयश शर्माने एक बळी मिळवला.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र