आंबा महाग आहे, चिंता नको; आधी खा, नंतर पैसे द्या!

पुणे : देशात फळांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकाने हापूस आंब्याची विक्री वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे. पुण्यातील एक व्यापारी अल्फोन्सो आंबा चक्क मासिक हप्त्यावर (ईएमआय) विक्री करत आहे. आंब्याच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन व्यापाऱ्याने हे पाऊल उचलले आहे.


गुरुकृपा ट्रेडर्स अँड फ्रूट प्रॉडक्ट्सचे गौरव सणस यांनी सांगितले की, हंगामाच्या सुरुवातीला आंब्याचे दर नेहमीच जास्त असतात. आम्ही विचार केला की जर रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर हप्त्यांवर विकत घेता येतात तर आंबा का नाही. राज्यातील कोकण विभागातील देवगड आणि रत्नागिरी येथील अल्फोन्सो अर्थात 'हापूस' आंबा किरकोळ बाजारात सध्या १०० ते १३०० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे.


सणस यांनी दावा केला की, त्यांचा हा ईएमआयवर आंबे विकणारा देशातील पहिला दुकान आहे. सणस यांच्या आउटलेटवरून ईएमआयवर फळे खरेदी करण्याची प्रक्रिया मोबाईल फोन खरेदी करण्यासारखीच आहे. ग्राहकाला क्रेडिट कार्ड वापरणे आवश्यक आहे आणि खरेदीची रक्कम तीन, सहा किंवा १२ महिन्यांच्या ईएमआयमध्ये रूपांतरित केली जाते. ही योजना ५,००० रुपयांच्या किमान खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सणस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद