राज्यात अवकाळी पावसाचा पून्हा धुमाकूळ, गारपिटीने मोठे नुकसान

बळीराजाची पुन्हा दैना, फळबागा, पिकांवर विपरित परिणाम


मुंबई : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतक-यांची झोप उडवली आहे. बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. राज्यात सर्व भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे असून गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपिटी होण्याची शक्यता आहे.



आज झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला आंबा, काजू, कोकम गळून पडला आहे. द्राक्षांच्या बागांवरही विपरित परिणाण झाला आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या अवकाळीने मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे.


दरम्यान, हवामान विभागाकडून मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तळकोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.


राज्यभरात उकाडा जाणवत असताना दुपारपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.


कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पाठोपाठ सातारा, मेढा, जावली या भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुलगाव परिसरातील काही भागात पावसासह गारपीट झाली.


अकोल्यात पावसामुळे पातूर आणि बाळापुरात मोठं नुकसान झालं आहे. गारपिटीने संत्रा, भाजीपाला, गहू आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे अकोला बाजार समितीत शेतमालाचं नुकसान झालं. बाजार समितीत सध्या विकण्यासाठी आलेला हरभरा आणि गहू या पावसामुळे भिजला.


दरम्यान, तळकोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबोली, सिंधुदुर्ग, चौकुळ, गेळे परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजूसह जांभुळ पिकाला फटका बसला आहे.


भारतीय हवामान खात्याकडून पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा आणि पुढे पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भात गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद

Dr Sampada Munde Case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 'खासदार कनेक्शन'! सुसाईड नोटमध्ये अत्याचाराचा उल्लेख

डॉ. संपदा मुंडेंच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, फलटण प्रकरणात मोठी अपडेट समोर सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण

Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट! एक्स्प्रेस वे आता 'दहा पदरी' करण्याचा MSRDCचा मोठा निर्णय, असा असणार 'मास्टर प्लॅन'

मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे. मुंबई-पुणे

Satara Crime: CM फडणवीसांची ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’! साताऱ्यातील बलात्कारी PSI गोपाल बदने निलंबित, SP दोशी म्हणाले, “कायद्यापुढे...

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या (Suicide)

Satara Doctor Crime News : साताऱ्यात खळबळ! फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

सातारा : सातारा (Satara Crime News) जिल्ह्यातील फलटण येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण येथील उपजिल्हा