बंगळूरुचा धुव्वा उडवत कोलकाताचा पहिला विजय

  189

घरच्या मैदानात कोलकाता शेर


कोलकाता (वृत्तसंस्था) : शार्दुल ठाकूरची वादळी खेळी, रहमानुल्ला गुरबाजचे अर्धशतक आणि वरूण चक्रवर्तीची भेदक गोलंदाजी गुरुवारी कोलकाता नाऊट रायडर्सला हंगामातील पहिलावहिला विजय मिळवून गेली. केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा ८१ धावांनी धुव्वा उडवत मोठा विजय मिळवला.


२०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला तशी बरी सुरुवात मिळाली. परंतु विराट कोहली, फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल हे तारांकीत फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने बंगळूरुचा संघ दबावाखाली आला. दहाच्या रनरेटने धावा जमवण्यात संघाला यश आले होते. परंतु हिच धावगती कायम ठेवण्याच्या नादात विराट कोहली हा सुनिल नरिनचा बळी ठरला. २१ धावा करणाऱ्या विराटला नरिनने त्रिफळाचीत करत बंगळूरुची धावसंख्या ४४ असताना कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच वरुण चक्रवर्तीने फाफ डु प्लेसीसचा अडथळा दूर करत बंगळूरुवर दबाव टाकला. हा दबावातून संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी आपसुकच ग्लेन मॅक्सवेलवर आली. मात्र यावेळी त्याने आपल्यावरचा विश्वास सार्थ करून दाखवला नाही. वरुणने ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेल यांना एकाच षटकात बाद केले. पटेलला तर भोपळाही फोडू दिला नाही. उरलीसुरली कसर सुयश शर्माने भरून काढली. वरुणने ४, तर सुयशने ३ बळी मिळवले. सुनिल नरिनने २ दोन फलंदाजांना माघारी धाडले. शार्दुलला एक बळी मिळवण्यात यश आले. बंगळूरुचा संघ १७.४ षटकांत १२३ धावांवर सर्वबाद झाला.


खराब सुरुवात करूनही कोलकाता नाईट रायडर्सला मराठमोळ्या शार्दुल ठाकूरच्या २९ चेंडूंतील ६८ धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे ७ फलंदाजांच्या बदल्यात २०४ धावांचा डोंगर उभारता आला. शार्दुलच्या या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तत्पूर्वी सलामीवीर रहमानुल्ला गुरबाजला दुसऱ्या बाजूने साथ न मिळूनही त्याने ५७ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. मधल्या फळीत रिंकू सिंगच्या ४६ धावांची जोड होती. व्यंकटेश अय्यर, मनदीप सिंग, कर्णधार नितीश राणा आणि विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल या फलंदाजांनी गुरुवारी निराशा केली. मात्र तरीही शार्दुल ठाकूरने हाणामारीच्या षटकांत बंगळूरुच्या गोलंदाजांना चोप चोप चोपले. त्यामुळे कोलकाताला २० षटकांत २०४ धावा तडकावल्या. बंगळूरुच्या डेविड विल्लेने विलक्षण गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या १६ धावा देत २ विकेट मिळवल्या. त्यात त्याने एक निर्धाव षटक फेकले. कर्ण शर्माने २ विकेट मिळवले. मोहम्मद सिराज, मायकल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला