अमरावती: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतील अथवा भाषण करतील, त्या जागेचं शुद्धीकरण करू, असा संकल्पच खासदार नवनीत राणा यांनी जाहिर केला आहे. बडनेरा मार्गालगतच्या एका लॉनमध्ये आयोजित सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अमरावतीत गुरूवारी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावतीने सामूहिक हनुमान चालिसाचे २१ वेळा पठण करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेलो असता उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर पोलिस प्रशासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे १४ दिवस मुंबई येथील कारागृहात राहावे लागले. मी खासदार महिला असताना महाविकास आघाडी सरकारने कशाप्रकारे अन्याय केला, याचा पाढा नवनीत राणा यांनी वाचला.
मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्याला १४ दिवस तुरुंगात जावं लागले. त्यामुळे जो हनुमंताला अन् रामाला मानत नाही ते ठिकाण अपवित्र होते. त्यामुळे जिथे जिथे उद्धव ठाकरेंची सभा होईल त्या ठिकाणी उद्धव ठाकरे भाषण करेल ती जागा पवित्र करू त्या जागेच शुद्धीकरण करू, असा घणाघाती वार खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…