हा कुजका मेंदू कुणाचा?

फडणवीसांच्या टीकेवर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा!


नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना 'तुमच्यासारख्या कुजक्या लोकांच्या मेंदूला सरळ केल्यानंतर सावरकरांना भारतरत्न मिळेल' असे म्हटल्याने हा कुजका मेंदू नेमका कुणाचा? यावरुन राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे.


नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला.


स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा यावरुन भाजपवर ठाकरे गटाकडून टीका करण्यात येते. या त्यांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी त्यांना चांगलेच झापले. यांच्याकडे एकच मुद्दा आहे, तो म्हणजे सावरकरांना भारतरत्न द्या. सावरकर हे भारतरत्न आहेतच. सावरकरांना भारतरत्न मिळायचा तेव्हा मिळेलच. आज देशामध्ये अनेल लोक असे आहेत की ज्यांना भारतरत्न मिळालेला नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंना अजून भारतरत्न मिळालेला नाही. सावरकरांना भारतरत्न जरुर मिळेल पण तुमच्यासारख्या कुजक्या लोकांच्या मेंदूला सरळ केल्यानंतर सावरकरांना भारतरत्न मिळेल, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली.


त्यांच्या या टीकेनंतर 'कुजका मेंदू' अशी टीका त्यांनी नेमकी कुणावर केली यावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नेमकी ही टीका उद्धव ठाकरेंवर, संजय राऊतांवर, राहुल गांधींवर होती की आणखी कुणावर? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


दरम्यान, यावेळी राहुल गांधींवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, 'राहुल गांधी म्हणाले की माफी मागायला मी सावरकर नाही. पण सावरकर होण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. सावरकरांना ज्या छोट्याशा खोलीत डांबल होतं त्याच ठिकाणी राहुल गांधींना मी एसी लावून देतो त्यांनी एक रात्र राहुन दाखवावं', असे खुले आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिले आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद