तीन महिन्यांत उडणार निवडणुकांचा धुराळा?

मुंबई : न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न विचारला जात असताना आता राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आणि तीन महिन्यांत निवडणुकांचा धुराळा उडणार असल्याचे जाहीर वक्तव्य केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून चर्चांना उधाण आले आहे.


सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना या याचिकांवर येत्या तीन महिन्यात निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच नगरपालिका, मनपा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा प्रश्न मार्गी लागेल, असे सावे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.


न्यायालयात ऑगस्ट २०२२ पासून ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेच्या संबंधित याचिका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासह महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रभाग रचनेला आव्हान देण्यात आले आहे. या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. सुनावणीसाठी तारीख उपलब्ध होत नसल्याने उशीर होत आहे. सुनावणी कधी होईल, सुनावणी झाल्यानंतर निकाल काय येईल, यावरच पुढील घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे कदाचित पावसाळ्यानंतरच निवडणुका होतील अशी शक्यता असल्याचे सावे म्हणाले.


न्यायालयाने जर प्रभाग रचना कायम ठेवली तर तीन महिन्यांनी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना

Navneet Rana : 'शेरनी अगर शांत है तो डकारणा कधी भूलती नहीं,'; नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल

अमरावती : अमरावतीतील (Amravati) एका कार्यक्रमात बोलताना माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा