वैशाखरे नदीवरील पुलाचे फोटो व्हायरल, कारण... 'भारतीय टेक्नॉलॉजीची' किमया

मुरबाड: बातमीतील फोटो पाहिला की तुमच्या लक्षा येईल की कल्याण - माळशेज महामार्गतील वैशाखरे नदीवरील पुलाकडे प्रशासनाचे किती लक्ष आहे. शेवटच्या घटका मोजत असलेला हा पूल जिवंत ठेवण्यासाठी चक्क 'होम मिनिस्टर' तेलाच्या रिकाम्या डब्यांमध्ये माती भरून त्यात बांबू रोवून त्या बांबूना रिबीन बांधण्यात आल्या आहेत. पुलाची ही दुरवस्था पाहता महाड येथील सावित्री नदीवरील झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


या पुलावर रात्रंदिवस हजारों वहानांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी वहाने खड्ड्यांमध्ये आदळुन पुलाचा कठडा तोडून खाली कोसळतात. असे अपघात सातत्याने घडत असुन वहान चालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.


दरम्यान, बांधकाम खात्याच्या या नावीण्यपूर्ण खास भारतीय टेक्नॉलॉजीचा माळशेज मार्गे जाणारे येणारे पर्यटक फोटो काढून आपल्या नातेवाईकांना तसेच देशविदेशातील, मित्रमैत्रिणींना पाठवत असल्याचे काहींनी सांगितले. अंदाजे १९७५ साली बांधण्यात आलेला पुल पुर्णपणे जीर्ण व नादुरुस्त झाला असुन शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.