वैशाखरे नदीवरील पुलाचे फोटो व्हायरल, कारण... 'भारतीय टेक्नॉलॉजीची' किमया

मुरबाड: बातमीतील फोटो पाहिला की तुमच्या लक्षा येईल की कल्याण - माळशेज महामार्गतील वैशाखरे नदीवरील पुलाकडे प्रशासनाचे किती लक्ष आहे. शेवटच्या घटका मोजत असलेला हा पूल जिवंत ठेवण्यासाठी चक्क 'होम मिनिस्टर' तेलाच्या रिकाम्या डब्यांमध्ये माती भरून त्यात बांबू रोवून त्या बांबूना रिबीन बांधण्यात आल्या आहेत. पुलाची ही दुरवस्था पाहता महाड येथील सावित्री नदीवरील झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


या पुलावर रात्रंदिवस हजारों वहानांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी वहाने खड्ड्यांमध्ये आदळुन पुलाचा कठडा तोडून खाली कोसळतात. असे अपघात सातत्याने घडत असुन वहान चालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.


दरम्यान, बांधकाम खात्याच्या या नावीण्यपूर्ण खास भारतीय टेक्नॉलॉजीचा माळशेज मार्गे जाणारे येणारे पर्यटक फोटो काढून आपल्या नातेवाईकांना तसेच देशविदेशातील, मित्रमैत्रिणींना पाठवत असल्याचे काहींनी सांगितले. अंदाजे १९७५ साली बांधण्यात आलेला पुल पुर्णपणे जीर्ण व नादुरुस्त झाला असुन शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे