संजय राऊत यांचे वक्तव्य वाह्यात! त्यांच्यावरच दंगलीचा गु्न्हा दाखल करा, बावनकुळेंचा हल्लाबोल

Share

नागपूर: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे वक्तव्य वाह्यात असून त्यांच्या या वक्तव्याने जर पुन्हा दंगली झाल्या तर राऊतांवरच दंगलीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या छत्रपती संभाजीनगरातील दंगल प्रकरणावरुन केलेल्या भडकावू वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या दंगली झाल्या त्या सरकार पुरस्कृत होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठीच हे कटकारस्थान रचल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या वक्तव्यावरुन राऊतांवर निशाणा साधत बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांनी असे बोलणे म्हणजे पु्न्हा एकदा चिथावणी देण्यासारखे आहे. यापूर्वी देखील राज्यात दंगली घडल्या. मात्र, आम्ही विरोधी पक्षात असूनही राऊतांसासरखे वाह्यात वक्तव्य केले नाही.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने त्यांची सभा घ्यावी, आम्ही देखील वीर सावरकर यात्रा काढणार आहोत. मात्र, संजय राऊत यांनी जर भडकाऊ भाषण केले तर महाविकास आघाडीची सभा कशी होईल मला माहिती नाही. त्या ठिकाणी संजय राऊत आणि चंद्रकांत खैरै यांच्यामुळे वातावरण बिघडू शकते, असे म्हणत सामाजिक सलोखा निर्माण करत महाविकास आघाडीने सभा घ्यावी, असेही त्यांनी सुचविले.

Recent Posts

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

49 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…

1 hour ago

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

2 hours ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामीच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

2 hours ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

2 hours ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

3 hours ago