देश तुमच्या बापाचा माल आहे का? माजी खासदार निलेश राणे यांचा ठाकरे गटासह काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल

सुषमा अंधारेंनी मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि संजय राऊत तर रिकाम टेकडा माणूस


बीड : राजकारणात आजकाल कोणीही उठतो आणि बेताल भाषा वापरतात त्यावर मर्यादा आल्या पाहिजे. कोणताही माहिती नसताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे वीर सावरकरांचा अपमान करतात. त्याबद्दल न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आणि खासदारकीही रद्द झाली. इकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात, जसे की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. कधी मंत्री होत्या का? त्यामुळे नेमका हा कॉन्फिडन्स त्यांच्यात कुठून आला? हेच कळत नसल्याचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी म्हटले आहे.


२०२० मधील प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणे आज केज न्यायालयात हजर झाले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना निलेश राणे म्हणाले की, अंधारे एकदाही निवडणूक लढल्या नाहीत. माझ्यापेक्षा त्या तीन वर्षांनी लहान आहेत. अंधारेताई जी भाषा वापरतात त्यावर मर्यादा आली पाहिजे. मर्यादा देखील पाळल्या पाहिजे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर बोलता, कोणत्या अधिकाराने तुम्ही बोलता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.



संजय राऊत तर रिकाम टेकडा माणूस


दरम्यान संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. संजय राऊत रिकाम टेकडे आहेत. त्यांना दुसरे काहीच काम नाही. महाराष्ट्रात त्यांची किंमत काय? पत्रा चाळचा तो आरोपी आहे. संजय राऊत याचा काय संबंध, असे म्हणत निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.



देश तुमच्या बापाचा माल आहे का?


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना मिळालेला सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत निलेश राणे यांनी टीका केली आहे.





निलेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “२००९ ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. AICC व IYC ऑफिस शासकीय बंगल्यात आहेत. सोनिया गांधी ज्या घरात राहतात ते घर भारताच्या पंतप्रधानांकडे असलं पाहिजे पण त्या आजही तिथे राहतात”, अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच, देश तुमच्या बापाचा माल आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त