राहुल गांधींच्या सावरकरांवरील टीकेनंतर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, आता रस्त्यावर उतरणार

राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात 'सावरकर गौरव यात्रा'


मुंबई: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काल मालेगाव येथे राहुल गांधींवर उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका हे, 'उशीरा सुचलेले शहाणपण आहे', असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात 'सावरकर गौरव यात्रा' काढणार असल्याचीही घोषणा केली.


एकनाथ शिंदे म्हणाले, ''राहुल गांधी वारंवार म्हणतात, मी सावरकर नाही, गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. तेवढा त्याग, देशाबद्दल प्रेम असायला पाहिजे. तुम्ही काय सावरकर होणार? तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. आपल्या देशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे समजू शकतो, पण परदेशात जाऊन निंदा करणे हा देशद्रोह आहे,' अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.



बाळासाहेब ठाकरे असते तर सावरकरांचा अपमान सहन केला असता का?


उद्धव ठाकरे यांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, ''हिंदुत्व-हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात एकही शब्द काढला नाही. राहुल गांधींची खासदारकी कायद्याने गेली, त्याविरोधात यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणता. तुम्ही राहुल गांधींना जाब विचारला पाहिजे. कालचे वक्तव्य म्हणजे, उशीराने सुचलेले शहानपण आहे, असं म्हणतं त्यांनी, बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान सहन केला असता का?'', असा सवालही उपस्थित केला.


दरम्यान, राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य