नवी दिल्ली: खासदारकी गमावल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पहिली प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी राहुल गांधींनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांबरोबरच त्यांची बहिण प्रियंका गांधी यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही राहुल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचल्या आहेत
राहुल गांधींनी खासदारकी गमावल्यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राहुल गांधींनी, आपण भारतीयांचा आवाज बनून यापुढेही लढत राहू आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास आपण तयार आहोत असं म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या देशभरातील प्रमुख नेत्यांची ऑनलाइन माध्यमातून बैठक होणार असून पुढील वाटचाल कशी राहणार आहे यासंदर्भातील निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…