नवी दिल्ली : शिवसेनेने खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गुरुवारी ठाकरे गटाला जोरदार झटका दिला. गजानन किर्तीकर यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना सोपवण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे शिवसेना कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात संजय राऊत येथून पुढे संसदेतील शिवसेना पक्षाचे नेते नसतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची या पदावर निवड केली जावी. आमच्याकडे बहुमत असल्याने, संजय राऊत यांना या पदावरून दूर केले जावे.’
दरम्यान, “शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदी नियुक्ती करीत माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री शिंदे तसेच संसदेतील सर्व शिवसेनेतील सहकाऱ्यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो”, असे ट्विट नियुक्तीनंतर किर्तीकर यांनी केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्वाच्या पदावरून ठाकरे गटाच्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचे काम शिंदे गटाकडून केले जात आहे. काही दिवसांपूर्वी संसदेतील पक्ष कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून त्याजागी स्व.आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते. शिवसेनेतील बंडानंतर काही काळ ठाकरे गटासोबत असलेले किर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना शिंदे गटाने मोठी जबाबदारी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती केली होती. त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र त्यांनी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पाठवले होते. पण शिवसेनेच्या बंडाळीनंतर ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटातर्फे किल्ला लढवताना मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या या टिकेला ब्रेक लावण्यासाठी त्यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…