राजगर्जनेनंतर 'त्या' अनधिकृत बांधकामावर हातोडा!

माहीम येथील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने केले निष्कासित


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहीम भागात अनधिकृत बांधकाम झाल्याचे म्हटले होते. तसेच एक महिन्यात बांधकाम हटवले नाहीतर त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू असा इशाराही त्यांनी दिला होता. यानुसार रातोरात चक्रे हलली आणि पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम निष्कासित केले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली.


प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे गेल्या २ वर्षात समुद्रात कथित मजार उभारण्यात आली. माहीम दर्गाच्या मागे काही वर्षांपासून समुद्रात नवीन हाजीअली तयार करण्याचे काम सुरू होते, असा आरोप राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत केला होता.


हे प्रकरण संवेदनशील असल्याने कारवाईवेळीची कोणतीही दृष्य दाखवण्यात आलेली नाहीत. आता माहीम समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.


दरम्यान, तोडकाम पूर्ण झाल्याचं मनसे नेत्यांना प्रशासनाकडून कळवण्यात आले. प्रशासनाने ही तातडीने दखल घेतल्याबाबत मनसेने प्रशासनाचे कौतुक केले आहे. त्याचसोबत इतर ठिकाणीही अशी बांधकामे होत असतील तर त्याठिकाणी कारवाई व्हावी. तसेच त्या जागेवर पुन्हा असे बांधकाम होणार नाही याची दक्षता प्रशासनासोबत स्थानिकांनीही घ्यावी. यापुढे असे होऊ नये हे सगळ्यांनीच पाहिले पाहिजे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

मुंबई पालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतील गैरव्यवहाराचे ऑडिट होणार

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत घोषणा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

फिल्म बनवण्याच्या नावाखाली डॉक्टरची कोट्यवधींची फसवणूक

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यावर उदयपूरमधील एका डॉक्टरकडून

नगरविकाससोबतची कांजूरमार्ग कचराभूमी बैठक निष्फळ

११ डिसेंबरच्या न्यायलयीन सुनावणीकडे लक्ष मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, दैनंदिन कामाचे तासही वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पावसाळा संपल्यापासूनच करणार सुरुवात

कचरा आणि माती स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर एक दिवस आड वाहने उभी करण्यास परवानगी नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ