यंदाचा गुढीपाडवा होणार गोड, आंब्याचे दर घसरले

मुंबई: गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर आंबे खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा दाखल झाल्यामुळे हापूस आंब्याचे दर खाली आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा गुढीपाडवा यंदा गोड होणार आहे.


नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक यंदा दरवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. सध्या दिवसाला ६० ते ६५ हजार हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून साधारण ४५ हजार हापूस आंब्याच्या पेटी येत असून १५ ते २० हजार पेट्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतून दाखल होत आहेत.


आंबा जास्त येऊ लागला असल्याने दर सुद्धा सध्या कमी झालेले आहेत. पिकलेला हापूस आंबा ६०० ते १६०० रुपये डझन विकला जात असून हिरवा आंबा ४०० ते १ हजार रुपयाने विकला जात आहे. दरम्यान राज्यात तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडत असला तरी कोकणात तो पडला नसल्याने आंब्यावर याचा परिणाम झालेला नाही. या वर्षी मार्च महिन्यात मोठी आवक असली तरी एप्रिलमध्ये हापूस आंब्याची आवक कमी राहिल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.


कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार मोठ्या प्रमाणावर आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. यात कोट्यावधींची उलाढाल होते. यंदा आंब्याचे दर घसरल्याने गुढीपाडव्याला आमरस पुरीवर ताव मारणं सामान्यांच्या अवाक्यात आलं आहे.

Comments
Add Comment

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५