यंदाचा गुढीपाडवा होणार गोड, आंब्याचे दर घसरले

मुंबई: गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर आंबे खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा दाखल झाल्यामुळे हापूस आंब्याचे दर खाली आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा गुढीपाडवा यंदा गोड होणार आहे.


नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक यंदा दरवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. सध्या दिवसाला ६० ते ६५ हजार हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून साधारण ४५ हजार हापूस आंब्याच्या पेटी येत असून १५ ते २० हजार पेट्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतून दाखल होत आहेत.


आंबा जास्त येऊ लागला असल्याने दर सुद्धा सध्या कमी झालेले आहेत. पिकलेला हापूस आंबा ६०० ते १६०० रुपये डझन विकला जात असून हिरवा आंबा ४०० ते १ हजार रुपयाने विकला जात आहे. दरम्यान राज्यात तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडत असला तरी कोकणात तो पडला नसल्याने आंब्यावर याचा परिणाम झालेला नाही. या वर्षी मार्च महिन्यात मोठी आवक असली तरी एप्रिलमध्ये हापूस आंब्याची आवक कमी राहिल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.


कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार मोठ्या प्रमाणावर आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. यात कोट्यावधींची उलाढाल होते. यंदा आंब्याचे दर घसरल्याने गुढीपाडव्याला आमरस पुरीवर ताव मारणं सामान्यांच्या अवाक्यात आलं आहे.

Comments
Add Comment

'पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय होणार नाही'

मुंबई :  पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांची नियुक्ती ही गुणवत्तेवर होत असून उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय

मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती

निधी संपवण्यासाठी महापालिका शाळांच्या मुलांची सहल; महापालिकेच्या स्थायी समितीने दाखवला प्रशासनाला इंगा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

कोस्टल रोडवरील पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्तावही रोखला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

मार्च उजाडला तरी मुंबईतील नालेसफाईची कामे सुरु होईनात; स्थायी समितीत सदस्य आक्रमक

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळा पूर्व नालेसफाईचे काम हाती घेतले. एरव्ही निविदा विलंबाने झाल्यामुळे

गारगाई धरणाच्या बांधकामाचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून