मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन सात दिवस झाले. शासनाने आवाहन केले मात्र कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. तर कुठे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात आता तहसीलदार, नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी बेमुदत संपावर जाणार असून २७ मार्चपासून लेखणी आणि ३ एप्रिलपासून बेमुदत कामकाज बंद करण्याचा इशारा दिला आहे. या काळात कायदा सुव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्तीचे काम करणार असल्याचे महाराष्ट्र तहसीलदार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील तहसीलदार, नायब तहसीलदार, उप जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांनी संपावर जात असल्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या पंचनाम्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून संप काळात आंदोलनाचे विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
सर्व कर्मचारी आपापल्या कार्यालयासमोर, शाळेसमोर दुपारी १२ ते साडेबारा या वेळात गगनभेदी थाळी नाद करून राज्य सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा धिक्कार करणार आहेत
या दिवशी जिल्हानिहाय कर्मचारी, शिक्षक काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहे. घोषणांच्या निनादात निदर्शने करण्यात येणार आहे.
या दिवशी जिल्हा निहाय कर्मचारी शिक्षक कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेध व्यक्त करणार आहेत.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…