मुरबाड: टोकावडे वन विभागाच्या हद्दीत असलेले खेडले, पऱ्हे, पाडाले, ठुणे परिसरातील सुमारे दीडशे एकर जागेतील वनसंपदा वणव्यात जळून खाक झाली. यात वन्यजीव सृष्टी सुद्धा होरपळून मृत्यूमुखी पडली. मात्र याकडे वनखात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात असून यास जबाबदार कोण असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मुरबाड तालुक्यात विविध ठिकाणी वणवा लागून हजारो एकर जमिनीवरील वनसंपदा जळून नष्ट झाली. यात लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली झाडे आगीत जळून खाक झाली आहेत.
वृक्ष लागवड करण्यासाठी जो निधी खर्च होतो त्यापैकी काही निधी झाडांच्या संरक्षणासाठी वापरण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केली आहे. कर्मचारी व अधिकारी यांनी शिल्लक राहिलेल्या वनसंपदेचे वेळीच संरक्षण करण्यासाठी उपयोजना कराव्यात अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…