नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा

Share

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुंबई : मागील चार दिवसांपासून राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसलेले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संप पुकारण्यात आलेला आहे. विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला समर्थन दिले आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने अशी जुनी पेन्शन योजना व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. असे असतानाच आता राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नवीन पेन्शन योजनेत कुटुंब निवृत्ती वेतनाबाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संप पुकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन पेन्शन योजनेमध्ये कुटुंब निवृत्ती वेतन आणि कर्मचाऱ्याचे मृत्यू योगदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, नवीन पेन्शन योजनेत कुटुंब निवृत्ती वेतन नेमकं किती मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही.

Recent Posts

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

3 minutes ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

24 minutes ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

37 minutes ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

2 hours ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

2 hours ago