नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशभरात इन्फ्लुएंजा (Influenza H2N3) च्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आता कोरोना व्हायरसनेही डोके वर काढल्याचे दिसत आहे. देशात जवळपास चार महिन्यानंतर एका दिवसात कोरोनाच्या ७५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ६२३ वर पोहोचली आहे.
मुंबईत सोमवारी १८ रुग्ण आढळले होते. तर मंगळवारी ही संख्या दुप्पट म्हणजेच ३६ रुग्ण इतकी झाली होती. यामध्ये दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून अन्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे न दिसल्याने त्यांना घरात विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे अजूनपर्यंत मृत्यूची नोंद झालेली नाही.
तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या अनेक लोक प्रवास करत आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर मुंबईतील लोक एडिनोव्हायरस आणि एच3एन2 सारख्या व्हायरल इंफेक्शनमुळे आजारी पडत आहेत. ठाण्यातही बुधवारी कोरोनाचे २४ रुग्ण आढळले होते. आता ठाण्यात कोरोना रुग्णसंख्या ९८ इतकी आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…