मुंबई : दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ्ड व्हिडिओ प्रकरणावर प्रकाश सुर्वे यांनी मौन सो़डलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे तसेच प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पाच जणांना अटकही झाली. या दरम्यान शीतल म्हात्रे या वेळोवेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या. पण, इतक्या दिवसांनंतर प्रकाश सुर्वे प्रथमच माध्यमांसमोर आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वाद यात्रे निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या मॉर्फ्ड व्हिडिओवर इतके दिवस प्रकाश सुर्वे यांनी मौन का धारण केले यावर चर्चेला उधाण आले होते. या चर्चेला पुर्णविराम देत प्रकाश सुर्वे यांनी माध्यमांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून कुणी तरी त्यात गाणं अपलोड करून विकृतपणा केल्याचं सुर्वे यांनी म्हटलं आहे. तसेच शीतल म्हात्रे आपल्याला बहिणीसारख्या आहेत, असं सांगतानाच विरोधकांना नैराश्य आलं आहे. माझ्या मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे त्यांना पाहवत नाहीत. त्यामुळेच हा विकृतपणा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…