पोलीस सलमान खानची सुरक्षा वाढवण्याच्या तयारीत

गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या धमकीमुळे खळबळ


मुंबई: एकेकाळी दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करुन गुंडांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या सलमान खानच्याच सुरक्षेची चिंता आता मुंबई पोलिसांना सतावते आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने दिलेल्या खळबळजनक धमकीनंतर पोलीस सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या विचारात आहेत.


गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने सलमान खानला धमकी दिली आहे. आम्ही त्याचा अहंकार तोडल्याशिवाय राहणार नाही. त्याने परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असे तो म्हणाला आहे. या मुलाखतीनंतर मुंबई पोलिस अलर्ट झाले असून त्यांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.


लॉरेंस बिश्नोई म्हणाला, माझ्या मनात सलमान खान बद्दल लहाणपणापासून राग आहे. त्याने काळवीटाची हत्या केल्याने आमचा समाज नाराज आहे. याबाबत सलमान खान याने आत्तापर्यंत आमच्या समाजाची माफी मागितलेली नाही. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन सर्वांसमोर येऊन माफी मागावी अन्यथा त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील देऊ केले होते. त्यामुळे सलमान खानला मारणे हे आमचे ध्येय आहे, असेही बिश्नोई याने मुलाखतीत म्हटले आहे.



याआधीही दिली होती धमकी


दरम्यान, लॉरेंस बिश्नोईने याआधी देखील सलमान खानला मारण्याची धमकी दिलेली होती. त्यात हा प्रकार पुन्हा घडल्यामुळे पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेतला. सलमानला सध्या व्हाय कॅटेगिरीची सुरक्षा दिली आहे. ती वाढवून झेड किंवा एक्स कॅटेगिरीची सुरक्षा देण्यात यावी का? याबाबत पोलिस विचार करत आहेत.

Comments
Add Comment

मालाडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले जुने

मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे

महापौरांनी जाहीर केला १०० दिवसांचा कार्यक्रम

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर

बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी

विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या