पोलीस सलमान खानची सुरक्षा वाढवण्याच्या तयारीत

  203

गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या धमकीमुळे खळबळ


मुंबई: एकेकाळी दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करुन गुंडांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या सलमान खानच्याच सुरक्षेची चिंता आता मुंबई पोलिसांना सतावते आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने दिलेल्या खळबळजनक धमकीनंतर पोलीस सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या विचारात आहेत.


गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने सलमान खानला धमकी दिली आहे. आम्ही त्याचा अहंकार तोडल्याशिवाय राहणार नाही. त्याने परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असे तो म्हणाला आहे. या मुलाखतीनंतर मुंबई पोलिस अलर्ट झाले असून त्यांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.


लॉरेंस बिश्नोई म्हणाला, माझ्या मनात सलमान खान बद्दल लहाणपणापासून राग आहे. त्याने काळवीटाची हत्या केल्याने आमचा समाज नाराज आहे. याबाबत सलमान खान याने आत्तापर्यंत आमच्या समाजाची माफी मागितलेली नाही. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन सर्वांसमोर येऊन माफी मागावी अन्यथा त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील देऊ केले होते. त्यामुळे सलमान खानला मारणे हे आमचे ध्येय आहे, असेही बिश्नोई याने मुलाखतीत म्हटले आहे.



याआधीही दिली होती धमकी


दरम्यान, लॉरेंस बिश्नोईने याआधी देखील सलमान खानला मारण्याची धमकी दिलेली होती. त्यात हा प्रकार पुन्हा घडल्यामुळे पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेतला. सलमानला सध्या व्हाय कॅटेगिरीची सुरक्षा दिली आहे. ती वाढवून झेड किंवा एक्स कॅटेगिरीची सुरक्षा देण्यात यावी का? याबाबत पोलिस विचार करत आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Assembly Session : एसटीची दुरावस्था ते ड्रग्ज तस्करी; अधिवेशनात आज ‘या’ मुद्द्यांवरून होणार खडाजंगी

विधान परिषदेत गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज गाजणार आहे. एक

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या