आम्ही सर्व सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : 'खरं सांगू का ज्यावेळी तुम्ही दोन सामने जिंकता त्यावेळी बाहेरचे लोक समजतात की आमच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आम्ही सर्व चारही सामन्यात आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो, अशा शब्दांत भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रत्युत्तर दिले आहे.


रवी शास्त्रींनी भारतीय संघ इंदूर कसोटी हरल्यानंतर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी भारतीय संघ अतीआत्मविश्वासामुळे हरला असे म्हणाले होते. यावर रोहित शर्माने चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कडक शब्दातच प्रतिक्रिया दिली. त्याने हे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचे सांगितले.
रवी शास्त्री यांनी समालोचन करताना भारताच्या पराभवावर वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, 'हा थोडा आत्मसंतुष्टपणा आणि अतिआत्मविश्वासचा परिणाम आहे. संघाने गोष्टी गृहीत धरल्या. तुम्ही निष्काळजीपणा केला त्यांनी तुम्हाला पराभूत केले.'


रोहित शर्माने दीड वर्ष रवी शास्त्रींवर बोलताना संयम बाळगला होता. मात्र त्याला रवी शास्त्रींनी तिसऱ्या कसोटीचे केलेले विश्लेषणाबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्याने कडक शब्दांचा वापर केला.

Comments
Add Comment

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

महिला एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वुल्फार्ट अव्वल

स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप

वर्ल्डकप जिंकल्यावर हरमनप्रीतने सोशल मीडियातून दिला 'हा' संदेश

नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला.

जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय