बाळासाहेब थोरातांची पत संपली! विखे पाटीलांचा थोरातांवर निशाणा

अहमदनगर : जिल्ह्यातील दोन महत्वाचे तसेच ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील शीतयुद्ध काही नवीन नाही. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी काही सोडत नाहीत. यातच आता विखे पाटील यांनी थोरातांवर निशाणा साधला आहे. थोरातांची पत संपली आहे असा वारच थेट विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर केला.


विखे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, थोरातांना सत्ता गेल्याचे वैफल्य आले आहे. सत्तेत राहून तुम्ही जनतेला काही न्याय देऊ शकला नाही. तुम्ही केवळ वाळू माफियांचे भले केले. तुम्ही एक उदाहरण दाखवून द्या ज्यामध्ये तुम्ही जनतेचं भले केलं. आज आम्ही जनतेला वेठीस धरणाऱ्या सर्व अपवृत्तीचा बंदोबस्त केला आहे. सत्ता गेल्याच दुःख थोरातांना आहे मात्र आता आपलं कोणी ऐकत नाही, आपली पत संपलेली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला आहे. तुम्ही या निवडुकीतील पराभवाची जबाबदारी देखील स्वीकारली नाही आहे.


राज्याचे महसूलमंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव असलेल्या जोर्वे येथे आले होते. यावेळी विखे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात विखे यांचे स्वागत केले. यावेळी मोठी साउंड सिस्टिमसह हजारो कार्यकर्ते यावेळी विखेंच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते. ओपन गाडीतून विखे यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी कार्यकर्तांनी मोठया उत्साहाने विखेंचे स्वागत केले.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा