बारावीचा पेपर व्हॉट्सॲपवरुनच लीक झाला

बारावी पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक सत्य समोर


मुंबई: बारावी पेपर फुटी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी व्हॉट्सॲपचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. चक्क व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणा प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले गेले आहेत.


तब्बल ९९ जणांचा व्हॉट्सॅप ग्रुप बनवून त्यामध्ये पेपर लीक केल्याचं उघडकीस आलं आहे. या ग्रुपमध्ये शिक्षक, काही विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक व विविध क्षेत्रातील काही व्यक्ती होते. मात्र, पेपर फुटीची घटना समोर आल्यावर हा व्हॉट्सॅप ग्रुप डिलीट करण्यात आला. याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडून अधिक तपास सुरु असून डिलीट केलेला डेटा लवकरात लवकर रिकव्हर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.



बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीचं मुंबई कनेक्शन


बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये दहा वाजून १७ मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध