मुरबाड तालुक्यातील जंगलांना वणव्यांचा शाप

  115

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यात भिमाशंकर, कळसूबाई व हरिश्चंद्रगड असे तीन अभयारण्य मोडत असून मुरबाड (पूर्व ) व (पश्चिम), टोकावडे (दक्षिण) व (उत्तर) या चारही वनपरीक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात वणवे लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या वणव्यांकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे.


गेल्या काही दिवसांपासून चारही वनपरीक्षेत्रातील राखीव जंगलात वारंवार वणवे लागत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून या वणव्यांमुळे वनसंपदा नष्ट होण्याबरोबरच वन्यप्राण्यांनाही याची झळ सोसावी लागत आहे. हे वणवे लावले जातात की, आपोआप लागतात याचा शोध घेणे गरजेचे असून येथील परीक्षेत्रातील वन अधिकारी याबात कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.


गेल्या काही वर्षांपासून वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वणवा लागत असल्याने पर्यावरणास वेठीस धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यावर संबंधित वन विभागाने गावोगावी सखोल प्रबोधन व मार्गदर्शन करण्याची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वन क्षेत्रातील वणवा लावणाऱ्यावर कारवाई कडक करावी. दरवर्षी वणवा लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब असून, यावर उपाय शोधून पर्याय निवडावा व पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळावे, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमी व स्थानिक नागरिकांमधूनही होत आहे.


तसेच एखाद्या ठिकाणी वणवा लागला असल्यास हे कळवण्यासाठी फोन केला तर एकही वनकर्मचारी अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. फोनही उचलत नाहीत त्यामुळे वनसंरक्षणात जनजागृतीच्या अभावाने व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या विभागात वणवा लागत असल्याचा ठपका वनअधिकाऱ्यांवर ठेवण्यात येत आहे. तसेच सुस्त पडलेल्या वनविभागाने वणव्यांचा विषय गांभिर्याने घ्यावा व दोषी आधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


दरम्यान याबाबत पर्यावरण प्रेमी प्रा. शिक्षक भालचंद्र गोडांबे, यांनी सांगितले की जागतिक वन्यजीव दिनानिमित्ताने सर्वजण शपथ घेऊ की, वनसंपदा, वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी जनजागृतीची नितांत गरज आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण

अभिनेत्री आलिया भटला असिस्टंटने लावला ७७ लाखांचा चूना

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश