राज्यात सुरु झालेल्या दहावीच्या परिक्षेला विद्यार्थ्यांच्या मृत्यूने गालबोट

Share

मुंबई: राज्यात आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेची बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली. मात्र, नाशिकमधील दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यूने या परिक्षेला गालबोट लागले आहे.

आगासखिंड येथील माध्यमिक शाळेतील दहावीचे शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे हे दोन विद्यार्थी पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आपल्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरुन जात असताना आगासखिंड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एच पी गॅसचा टँकरने धडक दिल्यामुळे जागीच मृत पावले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या लॉकडाऊननंतर प्रथमच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होत आहेत. या परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार विद्यार्थी बसले आहेत. ५ हजार केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. यंदाची दहावीची परीक्षा १०० टक्के कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाकडून मोहीम राबवली जात आहे. कॉपीचे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी प्रत्येक केंद्रावर घेतली गेली आहे. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पालकांनीदेखील परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.

कॉपीमुक्त अभियान कागदावर?

कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून पावले उचलली जात असताना दुसरीकडे याच अभियानाचा बोजवारा उडालेला दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळाला. परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूने आणि खिडकीच्या जवळ कॉपी देताना नागरिक मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

58 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

2 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago