पुढील तीन महिने कडक उन्हाळा, दुष्काळ पडणार!

  214

पुणे: होळीच्या आधीच थंडी माघारी फिरली असून फेब्रुवारी महिन्यातील वाढत्या तापमानाने नागरिकांना घाम फोडला. या महिन्यात पारा ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला. तसेच या पुढील तीन महिने तापमान अधिक उष्ण होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतेय. कालच सरलेला फेब्रुवारी महिना गेल्या १४७ वर्षातील सर्वात जास्त उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे. १८७७ साली फेब्रुवारीत सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले होते, त्यानंतर फेब्रुवारी २०२३ हा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरलाय. यातच मार्च ते मे महिन्यां दरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे.


उत्तर कोकणात सोबतच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार असून तापमान ४० अंशांपार जाण्याचा अंदाज आहे.
एकीकडे मार्चमध्ये काढणीला आलेल्या पिकांवर उष्णतेच्या माऱ्यामुळे पीक होरपळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ला निना वादळानंतर अल निनो वादळाचा प्रभाव वाढत असल्यानं यंदा दुष्काळाची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची