संजय राऊत नालायक माणूस, त्याचे संरक्षण काढा!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप


मुंबई : विधीमंडळाचा 'चोरमंडळ' असा उल्लेख करणा-या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत एकेरी भाषेत सडकून टीका केली.


संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. हे विधिमंडळ नसते तर तो खासदार पण झाला नसता. थोडी जरी लाज राहिली असेल तर त्याने खासदारकीचा राजीनामा द्यावा. चौकाचौकात त्याची धिंड काढली पाहिजे. संजय राऊतला आमच्या हवाले करा, जेणेकरून त्याची धिंड काढू शकतो. संजय राऊत याच्यावर कायदेशीर प्रक्रिया झालीच पाहिजे, संजय राऊतची सरकारने सुरक्षा काढावी, अशी मागणी नितेश राणे यांनी विधानसभेत केली.



संजय राऊतचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. तो सामनात येण्याआधी त्याचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही, असे संजय राऊतने लिहिले होते. राऊतांना दिलेले संरक्षण काढा. ते पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेले संरक्षण आहे,” असे नितेश राणे यांनी म्हटले.


तसेच आपल्याला रोज सकाळी संजय राऊतचे ऐकावे लागते. महाराष्ट्राला याची गरज आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी केला.


त्याचे मार्मिकमध्ये छापलेले कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असे छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचे १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असे वक्तव्य राणेंनी केले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र