Categories: रायगड

उधाणाच्या तडाख्याने शेकडो एकर जमिनीचे नुकसान

Share

मजगांव-खारदोडकुळे भागात नदीला खांड पडून पाणी शिरल्याने वालपिकासह जमिनीचे नुकसान; खार लँड विभागाचे दुर्लक्ष

  • संतोष रांजणकर

मुरूड : मुरुड तालुक्यातील मजगांव-खारदोडकुळे भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी नदीला खांड पडून शेतात शिरल्याने शेकडो एकर जमिनीसह शेतक-यांच्या तोंडाशी आलेल्या वाल पिकाचे नुकसान झाले आहे.

गेली पाच वर्षांपासून मजगांव-खारदोडकुळे भागातील खाडी परिसरात उधाणाच्या पाण्यामुळे नदीला खांड पडल्याने दरवर्षी शेतात पाणी शिरुन समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे आजतागायत शेतकऱ्यांच्या जमिनी व पिकांचे लाखोंचे नुकसान झाले व होत आहे. असे असतानाही खार लँड विभागाच्या अधिका-यांचे या भागाकडे असलेल्या दुर्लक्षाबाबत शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मजगांव-खारदोडकुळे भागातील खाडी परिसरात उधाणाच्या पाण्यामुळे नदीला खांड पडल्याने दरवर्षी शेतात पाणी शिरुन समस्यांना तोंड द्यावे लागते. छाया : संतोष रांजणकर

याबाबत येथील शेतकरी नथूराम तांबडकर यांनी संबंधित खार लॅंड विभागाशी शेतकरी बांधवांसह संपर्क साधून अर्ज – विनंत्या – निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही याठिकाणी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात खार लँड विभागाचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरत असल्याची खंत यावेळी तांबडकर यांनी व्यक्त केली.

यंदाही उधाणाचे पाणी शेतात शिरून शेतक-यांना शेतजमीन व वाल पिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

शासनाच्या खार लँड विभागाच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाने या भागाची प्रत्यक्ष पाहाणी करून याठिकाणी नदीला पडलेली खांड बुजविण्यात योग्य उपाययोजना करण्याची मागणी येथील शेतकरी बांधवांच्या वतीने नथूराम तांबडकर यांनी केली आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

3 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

4 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

4 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

6 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

7 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

7 hours ago