संसदेच्या गटनेतेपदी गजानन किर्तीकर!

नवी दिल्ली : संजय राऊतांना हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून संसदेच्या गटनेतेपदी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्याचे पत्र संसदीय कार्यमंत्र्यांना दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.


शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संघर्षावरील सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुरु झाली आहे. सत्तासंघर्षावरील सुनावणी याच आठवड्यात संपणार असल्याची माहिती घटनापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ८ महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेवाळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.


यावेळी शेवाळे म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्यानुसार आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते शिंदे आहेत. राज्यसभेचे गटनेते आता संजय राऊत आहेत. मात्र यापुढे संसदेचा गटनेता ठरविण्याचा अधिकार शिंदे यांनाच आहे. त्यानुसार संसदीय कार्यमंत्र्यांना संसदेचा गटनेता म्हणून गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती शेवाळे यांनी दिली.


राज्यसभेत तीन खासदार आहेत. त्यात संजय राऊत यांचाही समावेश आहे. त्यांनाही शिवसेनेचा व्हिप मान्य करणे अनिवार्य असल्याचे शेवाळे यांनी नमूद केले. मात्र आता लगेच संसदेच्या अधिवेशनात व्हिप देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र गटनेतेपदावरून संजय राऊत यांना हटविण्याची प्रक्रिया शिवसेनेकडून सुरू करण्यात आली हे त्यांनी स्पष्ट केले.


राज्यपालांनी जो फ्लोअर टेस्टचा निर्णय घेतला, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची वेगळी भूमिका होती. परंतु विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे होते. नेता म्हणूनच त्यांनी राज्यपालांना पत्र दिले होते. विधीमंडळ नेता म्हणूनच आमदारांनी शिंदेंवर दबाव आणला होता. गटनेता म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र पाठवल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये