भिवंडी: जलजीवन मिशन अंतर्गत ४८ गावांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा एकत्र भूमिपूजन सोहळा आज अंबाडी येथे केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्थानिक आमदार शांताराम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या योजनांसाठी १४३ कोटी खर्च केले जात आहेत.
तर तालुक्यातील केवणी दिवे, वडू नवघर, कोपर, टेंभिवली, जूनांदुर्खी, कांबे, खोणी, तकवाड, अनगाव, आवळे, अंबाडी, झिडके या १२ ग्रामपंचायतींच्या गावातील योजनांचे भूमिपूजन केवणी येथे झाले.
या योजनांमुळे भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असून ग्रामीण भागाला याचा मोठा फायदा होईल अशी माहिती केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी दिली.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हरघर जल, हरघर नळ संकल्पने अंर्तगत जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सहभागातून ही योजना होत असून तालुक्यातील १९६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…