अमित शहा यांच्या जीवाला धोका, दहशतवाद्यांकडून घातपात घडवून आणण्याची शक्यता

पाटणा : दहशतवाद्यांकडे रॉकेट स्टिंगर मिसाईल असल्याच्या वृत्तामुळे उद्या होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहारच्या दौऱ्यादरम्यान पाटणा ते पश्चिम चंपारणपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत बिहारच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी राजधानी पाटणा आणि पश्चिम चंपारणच्या डीएम, एसएसपी आणि एसपींना पत्र पाठवले आहे. यामध्ये दहशतवाद्यांकडे असलेले रॉकेट स्टिंगर क्षेपणास्त्राने खास व्यक्तींच्या जीवाला धोका असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाने त्यांच्यासाठी हाय अलर्ट जारी केला आहे.


अतिरिक्त पोलीस महासंचालक (सुरक्षा) यांनी पाठवलेल्या पत्रात महाबोधी मंदिरातून स्फोटके जप्त करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील फरार दहशतवाद्यांवर कारवाईच्या सुचना पोलिसांना दिल्या गेल्या आहेत. अशा स्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने बदल होण्याची शक्यता आहे.


छपराच्या मरहौरामध्ये लष्कर-ए-मुस्तफाच्या कमांडरला शस्त्रे पाठवल्याची कबुली स्फोट प्रकरणातील आरोपी जावेद आलम याने दिली आहे. यामध्ये त्याने स्टिंगर मिसाईलही असण्याची शक्यता व्यक्त केली. या अलर्टमध्ये हेलिपॅडबाबतही चर्चा करण्यात आली असून ते मानकांनुसार बनवावेत, असे सांगण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडे रॉकेट स्टिंगर मिसाईल असल्याच्या वृत्तानंतर धोका वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे हेलिपॅड परिसरात पोलिसांची सतत गस्त राहणार आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना

नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे

कुर्दिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; अमेरिका-इराण तणाव पुन्हा तीव्र

वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या

Lock Down in Pakistan : पाकिस्तानची दयनीय अवस्था, युद्धामुळे लागले 'लॉकडाउन'; शहबाज सरकारचा निर्णय

इस्लामाबाद : इराण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांची तेलवाहू, गॅस वाहू जहाजे

Maan ki Baat, Narendra Modi : "मन की बात"मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'

भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही

आयआरजीसीचा मोठा दावा; इराणने अमेरिकेचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ