‘जय लहुजी’चा नारा देत मातंग समाजाचे आझाद मैदानात शक्ती प्रदर्शन

मुंबई (प्रतिनिधी): अनेक वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांवर राज्यातील एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य आयोजित ‘जवाब दो’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी ‘जय लहू जी, जय मातंग’ अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आझाद मैदानाकडे मुंबई, ठाणे,नवी मुंबई सह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील हजारोंच्या संख्येने आलेले मातंग समाजातील युवा कार्यकर्ते आणि लहुजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध तीस ते चाळीस संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कूच केले.


रेल्वे, बसेस, एसटी, खासगी वाहने यातून दूरवरचा प्रवास करून आलेल्या महिलांनी रणरणत्या उन्हात लेकरा-बाळांसह सहभागी होत मातंग समाजाची वज्रमूठ सरकार विरोधात रोष व्यक्त करीत उगारली. आझाद मैदानात चहुकडे कार्यकर्त्यांनी पिवळे ध्वज हाती धरले होते. विविध मातंग संघटनांचे मोठमोठे बॅनर्स आणि त्यावरील ठळक मागण्या, डोक्यावर पिवळ्या टोप्या तर काहीं महिलांनी परिधान केलेले फेटे, एकाच रंगाच्या साड्या, झब्बे - कुर्ते तर काही जणांनी ग्रामीण पोशाख परिधान केले होते.


पुणे, नगर, पंढरपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण पट्टा येथून आलेले बहुसंख्य तरुण ‘जवाब दो’ आंदोलनातून आपला संताप सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात व्यक्त करीत होते. यावेळी जनहित लोकशाहीचे अशोक अल्हाट म्हणाले कि, ‘राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने अनुसूचित जातीच्या मातंग समाजाच्या विविध संघटनांचे आरक्षणाचे वर्गीकरण तात्काळ करायला हवे.तर बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजाच्या मुलांसाठी आर्टीची स्थापना व्हायला हवी, असे अशोक ससाणे म्हणाले.


साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण आंदोलनापैकी मातंग समाजाचे हे संस्था स्थापन झाली पाहिजे अशी मागणी करीत आंदोलनातून सरकारचे डोके नक्कीच ठिकाणावर येईल असे सुरेश साळवी म्हणाले. अशोक ससाने,बाबुराव मुखेडकर, एस.एस. धुपे, एडवोकेट गडीकर, अशोक उमप, लहू थोरात, प्रकाश जाधव हे मुंबईकर मातंग समाज बांधव आंदोलकांना व्यास पिठाकडे जाण्यासाठी आणि आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.


या आंदोलनात पंढरपूर येथून आलेले दलित महासंघाचे पांडुरंग खिलारे, लहुजी शक्ती सेनेचे बापू घाडगे,माळशिरस येथून आलेले बहुजन रयत परिषदेचे संजय साठे, मातंग एकता आंदोलनाचे पुणे इथून आलेले कार्यकर्ते,बहुजन समता पार्टीचे सांगली येथून आलेले बळीराम रणदिवे, पंढरपूर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा नेते जयसिंग मस्के आणि अशा अनेक संघटनेचे नेते आपल्या शेकडो कार्यककर्त्यांसह उपस्थित होते.

Comments
Add Comment

अजितदादांना झालेय तरी काय? आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द...

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार हे काल पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीत

लालबाग राजाच्या 'त्या' व्हिडिओप्रकरणी फोटोग्राफरवर गुन्हा दाखल

मुंबई: लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत गैरसमज निर्माण करणारे रिल तयार केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर

नेव्ही नगरमध्ये सुरक्षारक्षकाच्या हातावर तुरी देत अज्ञात व्यक्ती रायफल व काडतुसे घेऊन फरार !

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नौदलाच्या प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी एक मोठी घटना घडली.

घरबसल्या मिळणार रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती

नागरिकांसाठी https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष लिंकवर रस्‍ते कामांची माहिती उपलब्‍ध मुंबई : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा

व्हॉट्सअ‍ॅप वेब बिघडला! – स्क्रोल न झाल्याने वापरकर्ते हैराण

मुंबई : सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप वेब पेजच्या एका नवीन समस्येची तक्रार केली आहे , जिथे ते त्यांच्या