नेव्ही नगरमध्ये सुरक्षारक्षकाच्या हातावर तुरी देत अज्ञात व्यक्ती रायफल व काडतुसे घेऊन फरार !

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नौदलाच्या प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी एक मोठी घटना घडली. नौदलाच्या गणवेशात असलेली एक अज्ञात व्यक्ती नेव्ही नगरमधील निवासी भागात घुसला. आणि स्वत:ला पुढच्या शिफ्टसाठी आलेला गार्ड असल्याचे भासवून एका कनिष्ठ नौदल कर्मचाऱ्याकडून इन्सास रायफल व दोन मॅगझिनसह ४० जिवंत काडतुसे घेऊन फरार झाला .


हा व्यक्ती संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता ड्युटीवरील गार्डला भेटला आणि "तुला बदलण्यासाठी मला पाठवले आहे" असे सांगितले. गार्डने विश्वास ठेवून आपले शस्त्र त्याच्याकडे सुपूर्द केले. काही वेळाने घड्याळ विसरल्याचे लक्षात आल्याने तो गार्ड परत पोस्टवर आला , पण तोपर्यंत तो अज्ञात व्यक्ती तिथून फरार झाला होता .


त्यानंतर तीन तासांच्या शोधानंतरही काहीच सुराग न मिळाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. नौदल आणि कफ परेड पोलिसांनी यासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल केला असून एनआयए आणि एटीएससह अनेक सुरक्षा यंत्रणा तपासात सहभागी झाल्या आहेत.


नौदलाकडून परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, पण सध्या संशयिताचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, कर्मचाऱ्याने दिलेल्या वर्णनाच्या आधारे एक संशयिताचा स्केच तयार करण्यात आला आहे.


या घटनेमुळे लष्करी भागातील सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जान

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी,

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी