जिंदाल कंपनीच्या आगी प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

इगतपुरी (प्रतिनिधी): जिंदाल कंपनीला लागलेल्या आगी प्रकरणी सात जणांवर घोटी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


एक जानेवारी रोजी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या स्वरुपात आग लागली होती. या घटनेमध्ये तीन कामगार महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव, सुधीर लालताप्रसाद मिश्रा हे मयत झाले होते व २२ कामगार जखमी झाले होते. घोटी पोलीस स्टेशन येथे या घटनेबाबत अकस्मात मृत्यु तसेच अकस्मात जळीत दाखल करण्यात आले होते. अकस्मात जळीताची चौकशी सपोनि खेडकर हे करीत होते.


या अकस्मात जळीताचे चौकशीचे अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडीट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉली प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लॅन्ट हा सुमारे दिड महिन्यांपासुन बंद होता. हा प्लॅन्ट सुरु करण्यापुर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होवुन, तो सुरु करताना एस ओ पी चे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होवुन हि आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक चे उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण अर्जुन भोसले हे करीत आहेत.

Comments
Add Comment

Pune : चिमुरडीच्या आरोपीची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार; नवले पुलावरील आंदोलन थांबले, वाहतूक पुन्हा सुरू

पुणे : नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. आरोपीला फाशीला शिक्षा

नसरापूरच्या ग्रामस्थांचे पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन; बालिकेवर अत्याचार-खून प्रकरणाचे संतप्त पडसाद

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना

Pune Nasarapur Crime : आधी पुतणीवर अतिप्रसंग, मग महिलेवर अत्याचार अन् आता 4 वर्षाच्या चिमुकलीचा बळी; भोरमधील नराधमाचा काळा इतिहास उघड!

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण

Mother's Name Will On Document : आता हजेरीपत्रक आणि गुणपत्रिकेवर आईचं नाव अनिवार्य; सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून

Maharashtra Board 12th Result 2026 : बारावीचा निकाल ऑनलाईन कुठे आणि कसा पाहायचा? वेबसाईट क्रॅश झाल्यास मोबाईलवरच मिळवा झटपट रिझल्ट!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, शनिवार २ मे २०२६ रोजी इयत्ता १२ वी (HSC)