जिंदाल कंपनीच्या आगी प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

इगतपुरी (प्रतिनिधी): जिंदाल कंपनीला लागलेल्या आगी प्रकरणी सात जणांवर घोटी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


एक जानेवारी रोजी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या स्वरुपात आग लागली होती. या घटनेमध्ये तीन कामगार महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव, सुधीर लालताप्रसाद मिश्रा हे मयत झाले होते व २२ कामगार जखमी झाले होते. घोटी पोलीस स्टेशन येथे या घटनेबाबत अकस्मात मृत्यु तसेच अकस्मात जळीत दाखल करण्यात आले होते. अकस्मात जळीताची चौकशी सपोनि खेडकर हे करीत होते.


या अकस्मात जळीताचे चौकशीचे अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडीट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉली प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लॅन्ट हा सुमारे दिड महिन्यांपासुन बंद होता. हा प्लॅन्ट सुरु करण्यापुर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होवुन, तो सुरु करताना एस ओ पी चे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होवुन हि आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक चे उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण अर्जुन भोसले हे करीत आहेत.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची