इगतपुरी (प्रतिनिधी): जिंदाल कंपनीला लागलेल्या आगी प्रकरणी सात जणांवर घोटी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
एक जानेवारी रोजी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या स्वरुपात आग लागली होती. या घटनेमध्ये तीन कामगार महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव, सुधीर लालताप्रसाद मिश्रा हे मयत झाले होते व २२ कामगार जखमी झाले होते. घोटी पोलीस स्टेशन येथे या घटनेबाबत अकस्मात मृत्यु तसेच अकस्मात जळीत दाखल करण्यात आले होते. अकस्मात जळीताची चौकशी सपोनि खेडकर हे करीत होते.
या अकस्मात जळीताचे चौकशीचे अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडीट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉली प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लॅन्ट हा सुमारे दिड महिन्यांपासुन बंद होता. हा प्लॅन्ट सुरु करण्यापुर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होवुन, तो सुरु करताना एस ओ पी चे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होवुन हि आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक चे उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण अर्जुन भोसले हे करीत आहेत.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…