प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'आम्ही पुन्हा एकटे'

अकोला : उद्धव ठाकरेंचं चिन्ह गेलं, पक्षही हातातून गेला, आता नवा मित्रही पलटला अशी स्थीती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनोमिलन कायम राहिलं तर काय? असा प्रश्न आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना विचारला. त्यावर 'तर आम्ही पुन्हा एकटे' असं मोठं विधान त्यांनी केलं.


ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत आम्ही गेलोच होतो पण उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमात बुडालेले आहेत. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाकडून आम्हाला निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे मग आम्ही पुढचा विचार का करु, अशापद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याबाबत नकाराचे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले.


तसेच, एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे या दोघांमधील भांडण सोडवायला मी जाणार नाही. ज्यांचे-ज्यांचे भांडण आहे त्यांनी-त्यांनी ते आपापसात बसून सोडवावे. मी शक्यतो अशा भांडणात पडत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी