पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात, तीन ठार; तर चार गंभीर जखमी

पेण: पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे आज सायंकाळी ट्रक आणि इको कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक बराच काळ खंडित झाली होती. अपघातातील सर्व मयत आणि जखमी हे कोल्हापूरला बाळुमामाच्या यात्रेसाठी इको कारने जात होते.


या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, इको कारमधून भाविक बाळूमामाच्या यात्रेसाठी कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते. तर ट्रक खोपोलीहून पेणकडे येत होता. पेण पूर्व विभागातील वाक्रुळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये इको कार मधून प्रवास करणारे चालक नागेश विक्रम दिंडे (वय-२७), प्राजक्ता नागेश दिंडे (वय-२५) आणि विक्रम गोविंदराव दिंडे (वय-५०) हे जागीच ठार झाले. तर याच कार मधील गजानन चंदन वडगावकर (वय-१३), विकी विठ्ठल श्रीरामे (वय-१५), मीनाक्षी विक्रम दिंडे ( वय-२२), कविता विक्रम दिंडे (वय-४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.



अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी आणि स्थानिक युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तर कल्पेश ठाकूर यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून जखमींना पेणमधील सरकारी रुग्णालय, म्हात्रे रुग्णालय आणि नंतर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात तातडीने दाखल केले. कल्पेश यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले. दरम्यान, वाक्रुळ येथे राहणारे माजी आमदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.


सदर अपघाताची नोंद पेण पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत. या अपघातामुळे पेण-खोपोली मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक आपटा-रसायनी-पनवेल मार्गे वळविण्यात आली होती.



अपघातग्रस्त परिवार मुळचा कोल्हापूरचा


या अपघातातील दिंडे परिवार हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. दरवर्षी ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळुमामाच्या यात्रेसाठी जात असतात. यंदाही यात्रेसाठी निघाले असतानाच त्यांच्या परिवारावर हे मोठा संकट कोसळे. अपघाताचे वृत्त पेण फणसडोंगरी परिसरात पोहोचताच दिंडे परिवाराशी संबंधितांनी शोक प्रकट केला.

Comments
Add Comment

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.