पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात, तीन ठार; तर चार गंभीर जखमी

पेण: पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे आज सायंकाळी ट्रक आणि इको कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक बराच काळ खंडित झाली होती. अपघातातील सर्व मयत आणि जखमी हे कोल्हापूरला बाळुमामाच्या यात्रेसाठी इको कारने जात होते.


या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, इको कारमधून भाविक बाळूमामाच्या यात्रेसाठी कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते. तर ट्रक खोपोलीहून पेणकडे येत होता. पेण पूर्व विभागातील वाक्रुळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये इको कार मधून प्रवास करणारे चालक नागेश विक्रम दिंडे (वय-२७), प्राजक्ता नागेश दिंडे (वय-२५) आणि विक्रम गोविंदराव दिंडे (वय-५०) हे जागीच ठार झाले. तर याच कार मधील गजानन चंदन वडगावकर (वय-१३), विकी विठ्ठल श्रीरामे (वय-१५), मीनाक्षी विक्रम दिंडे ( वय-२२), कविता विक्रम दिंडे (वय-४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.



अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी आणि स्थानिक युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तर कल्पेश ठाकूर यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून जखमींना पेणमधील सरकारी रुग्णालय, म्हात्रे रुग्णालय आणि नंतर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात तातडीने दाखल केले. कल्पेश यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले. दरम्यान, वाक्रुळ येथे राहणारे माजी आमदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.


सदर अपघाताची नोंद पेण पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत. या अपघातामुळे पेण-खोपोली मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक आपटा-रसायनी-पनवेल मार्गे वळविण्यात आली होती.



अपघातग्रस्त परिवार मुळचा कोल्हापूरचा


या अपघातातील दिंडे परिवार हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. दरवर्षी ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळुमामाच्या यात्रेसाठी जात असतात. यंदाही यात्रेसाठी निघाले असतानाच त्यांच्या परिवारावर हे मोठा संकट कोसळे. अपघाताचे वृत्त पेण फणसडोंगरी परिसरात पोहोचताच दिंडे परिवाराशी संबंधितांनी शोक प्रकट केला.

Comments
Add Comment

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा