दोन दगडावर पाय ठेवलेले 'ते' २ खासदार कोण?

मुंबई : ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या बाजूने ६ खासदार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात ४ खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. राज्यसभेतल्या तीनही खासदारांनी शपथपत्र दिले असेल तर मग शपथपत्र न देणारे दोन खासदार लोकसभेतीलच होते का? असे तर्कवितर्क आता लढवले जात आहेत. या दोन खासदारांचा कोणाला पाठींबा द्यायचे याचा निर्णय पक्का झाला नव्हता का? तळ्यात की मळ्यात अशा द्विधा मनस्थितीत दोन दगडावर पाय ठेवलेले 'ते' २ खासदार कोण? यायीच चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या आकडेवारीच्या आधारे धनुष्यबाणासंदर्भात निर्णय सुनावला, त्या आकडेवारीत असे नमूद करण्यात आले आहे की, लोकसभेतील एकूण १९ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटाच्या बाजूने होते. त्यांची शपथपत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत. तर ठाकरे गटाच्या बाजूने लोकसभेचे सहा खासदार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र लोकसभेतील केवळ चारच खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर झाली आहेत. राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार असून त्या तीनही खासदारांची शपथपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आली आहेत.


राज्यसभा आणि लोकसभा मिळून एकूण नऊ खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र ठाकरे गटाकडून केवळ सातच शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाचा निकाल सांगतो. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणत्या दोन लोकसभा खासदारांची शपथपत्र सादर झालेली नाहीत? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या