दोन दगडावर पाय ठेवलेले 'ते' २ खासदार कोण?

  180

मुंबई : ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या बाजूने ६ खासदार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात ४ खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. राज्यसभेतल्या तीनही खासदारांनी शपथपत्र दिले असेल तर मग शपथपत्र न देणारे दोन खासदार लोकसभेतीलच होते का? असे तर्कवितर्क आता लढवले जात आहेत. या दोन खासदारांचा कोणाला पाठींबा द्यायचे याचा निर्णय पक्का झाला नव्हता का? तळ्यात की मळ्यात अशा द्विधा मनस्थितीत दोन दगडावर पाय ठेवलेले 'ते' २ खासदार कोण? यायीच चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या आकडेवारीच्या आधारे धनुष्यबाणासंदर्भात निर्णय सुनावला, त्या आकडेवारीत असे नमूद करण्यात आले आहे की, लोकसभेतील एकूण १९ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटाच्या बाजूने होते. त्यांची शपथपत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत. तर ठाकरे गटाच्या बाजूने लोकसभेचे सहा खासदार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र लोकसभेतील केवळ चारच खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर झाली आहेत. राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार असून त्या तीनही खासदारांची शपथपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आली आहेत.


राज्यसभा आणि लोकसभा मिळून एकूण नऊ खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र ठाकरे गटाकडून केवळ सातच शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाचा निकाल सांगतो. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणत्या दोन लोकसभा खासदारांची शपथपत्र सादर झालेली नाहीत? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक