शैलजा स्वीकारणार का वीणा आणि प्रभासचं नातं?

'हृदयी प्रीत जागते' ही एक तरुण संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेचा नायक रॉक बॅड परफॉर्मर आहे, तर नायिका कीर्तन गायिका आहे ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे.


कॉन्सर्टच्या शेवटी प्रभास वीणाला प्रपोझ करतो. पण ती त्याला उत्तर देऊ शकत नाही. वीणा घरी आल्यावर बघते, तर बाबा प्रचंड भडकले आहेत, या सर्व प्रकारामुळे बाबा वीणाचं गाणं बंद करतात. प्रभास वीणाला भेटायला तिच्या घरी येतो. तेव्हा बाबा त्याला निघून जायला सांगतात. प्रभासच्या लक्षात येतं की, वीणाचं ही त्याच्यावर प्रेम आहे. पण बाबांमुळे ती व्यक्त होत नाहीये. बाबा आणि प्रभास यांच्यात मोठा वाद होतो. प्रभास गावात थांबण्याचा निर्णय घेतो. देवाला साकडं घालतो. प्रभासला होणाऱ्या त्रासाने वीणा खूप तळमळते. ही गोष्ट शैलजाला कळते. ती प्रभासला न्यायला संगमनेरला येते. तेव्हा तिला समजतं की, मनोहरचं लग्न झाले असून वीणा ही त्याचीच भाची आहे. शैलजा प्रभासला घेऊन तडकाफडकी निघते. प्रभासची वीणासाठीची तळमळ बघून शैलजा त्यांचं नातं स्वीकारेल की नाकारेल? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Comments
Add Comment

दिवाळीच्या आधी परिणितीने दिली गुड न्यूज , परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा झाले आईबाबा...

चड्डा घराण्यात चिमुकल्याचा आगमन झालं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डाने दिली गुड न्युज. परिणीती आणि राघव यांनी

माझं कधी काय होईल मला माहित नाही... नाव ठेवणाऱ्यांना स्पष्टच बोलल्या उषा नाडकर्णी

मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्री मधल्या उषा नाडकर्णी बरेचदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी

२०२६ ची होळी सनी देओलसाठी ठरणार का महत्त्वाची ? आगामी चित्रपटाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने

भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या

'ठरलं तर मग' मालिकेत आजीची भूमिका साकारणार रोहिणी हट्टंगडी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.